पिंपरी (Pclive7.com):- गानसम्राज्ञी लता दीदी सर्वांच्याच गायन क्षेत्रातील प्रेरणास्थान होत्या. परंतु त्यांच्याकडून विशेष काही गायनाचे धडे घेतले नाही. दिदिंचा सहवास लाभला पण गुरू म्हणून नाही मिळाला. जे काही गायन करते ते फक्त माझे वडील हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडूनच शिकले आहे, असे प्रतिपादन प्रख्यात गायिका डॉ. राधा मंगेशकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे यांनी डॉ राधा मंगेशकर यांची मुलाखत घेतली. वपुर्झा आर्ट एंड क्लल्चर म्युझियम कुडजे ,मुळशी येथे निसर्गाच्या सानिध्यात ही मुलाखत पार पडली.
या प्रसंगी लंडन, स्विस, पॅरिस एक अविस्मरणीय अनुभव ह्या अनिता भिसे लिखित पुस्तकाचे प्रकाशनही राधा मंगेशकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार विलास लांडे,
याप्रसंगी हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, कुंदा भिसे, प्रेरणा बॅंकेच्या चंदा भिसे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संतोष घुले यांनी केले. आभार प्रदर्शन सचिव सुनील थोरात यांनी केले.
गानसम्राज्ञी लता दीदी गेल्यावर कसे वाटते असे विजय भिसे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राधा मंगेशकर म्हणल्या कि, कवी ग्रेस यांची घर थकलेले संन्यासी ह्या कवितेचा प्रत्यय लतादीदी गेल्यानंतर जाणवत आहे.. आणि मी सध्या त्याच अवस्थेतून जात आहे. अशी भावना व्यक्त केली. देशांमधील प्रबोधनात्मक काम करणाऱ्या संतांचा अभ्यास आणि त्यांच्या रचनांवर गायनाचे कार्यक्रम केले. रवींद्रनाथ टागोर, संत कबीर, मीराबाई आणि सूरदास यांचे तत्वज्ञान प्रिय असून कवी ग्रेस आणि कविवर्य ना धो महानोर यांच्याबद्दल विशेष आस्था आहे. कारण हि मंडळी समाज प्रबोधनाचे कार्य करीत असतात.
एकटीने जगप्रवास करताना त्यामध्ये येणाऱ्या अडचणी संकटे यांना तोंड देण्याची पूर्ण तयारी करावीच लागते. भारतातील खजुराहो येथील शिल्पे अत्यंत प्रेक्षणीय आणि आवडीची आहेत. त्यातील कामशिल्पे केवळ 10 टक्के असल्याचे त्यांनी नमूद केले आणि त्यावर सविस्तर विश्लेषण त्यांनी केले. अजंठा लेणी वयाच्या तीन टप्प्यात पाहिली आणि ती अधिकाधिक समजत गेली. प्रवास करताना तेथील स्थानिक खाद्यपदार्थ आवर्जून खात असते. सर्व प्रकारचे संगीत आवडते. सर्व प्रकारच्या गजल ऐकते. मेहंदी हसन हा आवडता गजल गायक असल्याचे नमूद केले. पाऊस कधीचा पडतो आहे ह्या कवितेच्या गायनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.