पिंपरी (Pclive7.com):- पवना धरण परिसरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे आज (शनिवारी) सकाळी धरणातील पाणीसाठा ९७.१७ टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे आज सकाळी सहा वाजता १२०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग जलविद्युत द्वारे करण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पवना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वेगाने वाढ झाली आहे. आज सकाळी सहा वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा ९७.१७ टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे यापुढे धरणात येणारा पाऊस (येवा) नुसार धरणातून विसर्ग सोडावा लागला आहे. आज सकाळी सहा वाजता १२०० क्युसेकने जलविद्युत व्दारे पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार पाऊस पडत असल्याने पवना नदी दुथडी भरुन वाहत आहेत. धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पवना धरण क्षेत्रात गेल्या २४ तासात झालेला पाऊस ११५ मि.मि. पावसाची नोंद झालीयं. १ जूनपासून सुमारे २१३३ मि.मि. पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत २१४४ मि.मि एवढा पाऊस झाला होता. धरणातील आजचा पाणीसाठा ९७.१७ टक्के म्हणजेच ८.२७ टीएमसी एवढा आहे. गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात ७.८८ टक्के वाढ झाली आहे. तर १ जूनपासून धरणातील पाणीसाठ्यात ८२.७१ टक्के एवढी वाढ झाली आहे.