नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा
पिंपरी (Pclive7.com):- पवना धरण परिसरात पावसाचा जोर आणखी वाढला आहे. यामुळे धरणातील पाण्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज (शनिवारी) रात्री १२ वाजल्यापासून ९ हजार ९३२ क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणात सध्या ९८ टक्क्याहून अधिक पाणीसाठा असून सकाळी ६ वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे आज रात्री १२ वाजल्यापासून धरणाचे ६ दरवाजे एकूण २ फूटाने उचलण्यात येतील. त्यातून १,४०० हायड्रो आणि सांडव्यातून ८,५३२ असे एकूण ९,९३२ क्युसेक्स वेगाणे विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. तरी नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.