पिंपरी (Pclive7.com):- सर्व शिक्षक परमेश्वराचे दूत म्हणून पवित्र कार्य करीत असतात, असे मत लेखक डॉ. शाळीग्राम भंडारी यांनी व्यक्त केले. लायन्स क्लब निगडीच्या वतीने आयोजित केलेल्या विशेष शिक्षक मानवंदना कार्यक्रमात ते बोलत होते.
दिव्यचक्षू, दिव्यांग, विद्यार्थ्यांना खास विशिष्ट शैलीने शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध करणाऱ्या शिक्षकांना मानवंदना कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर निगडी क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण मंत्री, सचिव देविदास ढमे, खजिनदार मनीषा गायकवाड, रिजन चेअरमन मनोज बन्सल, झोन चेअरमन हर्ष नायर, श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हरिदास नायर, महेश शाह, राधेश्याम भंडारी, आदी उपस्थित होते.अपंग विद्यालय यमुनानागर, कामायनी विद्यामंदीर निगडी, पिंपरी चिंचवड बधिर मूक विद्यामंदीर निगडी, हँडीकॅपडं सेंटर फॉर ब्लाइंड, मोहननगर, चिंचवड या संस्थांतील विशेष शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
डॉ.भंडारी पुढे म्हणाले कि, एखाद्या घरात दिव्यांग व्यक्ती ज्यावेळी जन्माला येते, त्यावेळी ती व्यक्ती त्या घराला शाप ठरते. शिक्षकांच्या अथक अविरत प्रयत्नांमुळेच अशी व्यक्ती शिकते, कौशल्य प्राप्त करते, पुढे हे विद्यार्थी मामलेदार, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त असे अधिकारी म्हणून त्या घरात प्रवेश करताता. त्यावेळी तीच व्यक्ती त्या घराण्याला वरदान ठरते. अर्थात त्यामागे आपल्या सर्व शिक्षकांचे, पालकांचेही योगदान असते, की ते शब्दात व्यक्त करता येत नाही.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हृषिकेश मुसमाडे, प्रास्ताविक मीनंजली मोहिते, तर आभार, देविदास ढमे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन राजीव कुटे व दिलीपसिंह मोहिते यांनी केले.