पिंपरी (Pclive7.com):- जाधववाडी-शिवरोड-मोशीला जोडणारा रस्त्यावरील रहदारीमुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे शिवसेना नेत्या सौ.रूपालीताई परशुराम आल्हाट यांनी वारंवार त्या संदर्भात प्रशासनाशी पत्रव्यवहार करून त्या संदर्भातील कामास त्यांना यश आले.
मध्यरात्री त्या रस्त्यावर थर्मोप्लास्टिक पेंट रम्ब्लरस्ट्रिप (पांढरे पट्टे) मारण्यात आले. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
पत्रकारांशी बोलताना सौ.आल्हाट म्हणाल्या की,” साहिल फोर्च्युन सोसायटी समोरील रस्त्यावर गतिरोधक नसल्या कारणांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते. त्याविषयीसंदर्भातील पत्रव्यवहार प्रशासनासोबत केला आसता प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली.
स्थानिक आधिकार्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधिंच्या दबावाखाली कामासाठी फंड नाही याप्रकारची उत्तरे मिळाली. त्यानंतर आम्ही जाहिरातबाजी करून प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर त्यांनी त्या कामास गति देऊन काम पुर्ण केले.”