आळंदी (Pclive7.com):- आळंदीसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेतील धरणातील पाणी पुणे मनपाच्या कुरुळी येथील जलशुद्धीकरण केद्रांतुन आळंदी नगरपरिषदेला देण्यासाठी टॅपिंगची परवानगी आळंदी नगरपरिषदेला मिळाली आहे.
हे लवकरच काम पुर्ण करुन आळंदी ग्रामस्थांना, भाविक भक्तांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येणार अशी माहिती आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजंयताताई उमरगेकर यांनी दिली.
पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आळंंदी नगराध्यक्षांना पत्र समक्ष दिले. यावेळी भाजप आध्यात्मिक विकास आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय घुंडरे, माजी नगरसेवक अशोकराव उमरगेकर, पांडुरंग ठाकुर उपस्थित होते.
या सर्व प्रकीयेला व आळंदीला शुद्ध पाणी मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीष बापट, पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ, खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांचे अतीशय मोलाचे सहकार्य लाभले अशी माहिती आळंदी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी दिली.