पिंपरी (Pclive7.com):- जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने बुधवारी आकुर्डी येथून पंढरपूरकडे प्रस्थान केले. या पालखीचा पहिला विसावा पिंपरीतील खराळवाडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झाला. यावेळी या मंदिरातील रोजच्या पूजापाठ साठी डॉ. कैलास कदम युवा मंच यांच्या वतीने ५१ टाळ, एक मृदंग आणि एक वीणा विठ्ठल चरणी अर्पण करण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमात यावेळी माजी नगरसेवक सद्गुरु कदम, माजी नगरसेविका निर्मला कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे, पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, भोजराज मिसाळ, कामगार नेते विजय पाटील, बाळासाहेब जाधव, आर. एल. जाधव, उमेश कुलकर्णी, मंदिर पूजा पाठ समितीचे दिलीप कोंडे, वैशाली गोगावले, सुरेंद्र पासलकर, दीपक कदम, सुनील येरुणकर, संदीप जगताप, चंद्रकांत गोगावले, ज्ञानेश्वर वायकर, हरी देवकर, महेंद्र जगताप, बाळासाहेब राणे, रवी चव्हाण, अण्णा रुपनर, शिवप्रसाद करमरकर आदींसह युवा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने वारकऱ्यांसाठी अल्पोहारचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका निर्मला कदम, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सायली नढे, पदाधिकारी डॉ. मनीषा गरुड आदी उपस्थित होते.