पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ॲम्बुलन्ससह वैद्यकीय सेवा सुविधा आणि औषधोपचाराकरीता शहरातील मनपाच्या सर्व मोफत आरोग्यसेवा आणि मोफत उपचारामध्ये आता शासन नियमाप्रमाणे दरवाढ रद्द करण्याची मागणी शाहूनगर, घरकुल येथील सामाजिक कार्यकर्त्या किर्तीताई जाधव यांनी केली आहे.
किर्तीतार्ई जाधव म्हणाल्या की, यशवंतराव चव्हाण रुग्णालयासह सर्व रुग्णालये निर्माण करताना कष्टकरी कामगार वर्गाला मोफत उपचार देणे हे मुख्य उद्दिष्ट होते. राज्यशासनाचे कोणतेही योगदान नसताना महापालिकेने शासन दराने दरवाढ करणे अतिशय चुकीचे आहे.
शिवानंद चौगुले, म्हणाले गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी ॲम्बुलन्स सेवा प्रत्येक किलोमीटरला 20 रुपये केल्याने रुग्णांना त्याचा आर्थिक बोजा पडत आहे. यापूर्वी पिंपरी चिंचवड मध्ये सुमारे 110 रुपयात मिळणारी सेवा आता किमान ₹500 ते 1000 रुपये मोजावे लागत आहे.
तरी सदर दरवाढ तात्काळ मागे घेऊन पूर्वीचे दर अंमलात आणावे अशी मागणी किर्तीताई जाधव यांनी केली आहे.