चिंचवड मतदारसंघासाठी ‘या’ दहा कारणांसाठी हवे नाना काटेंचेच नेतृत्व !
2. या शहरातील भरभराट आणि संपूर्ण शहरात पायाभूत सुविधांपासून नागरिकांच्या राहणीमानाचा झालेला कायापालट हे निर्विवादपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे योगदान आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या विकासाभिमुख राजकारणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आजवर दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रयत्नपूर्वक पार पाडण्याचा प्रयत्न नाना काटे यांनी केला आहे.
3. नाना काटे यांच्या याच प्रयत्नांचा परिपाक म्हणजे रहाटणी- पिंपळे सौदागर हा परिसर आज शहरातील सर्वाधिक विकसित, स्वच्छ आणि सुंदर परिसर म्हणून नावारूपाला आला आहे. योग्य नियोजन आणि वेगवान व्यवस्थापन यांच्या माध्यमातून आजवर त्यांनी त्यांच्या प्रभागातील विकासाला नवी उंची प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आहे. पिंपळे सौदागरचा झालेला सर्वांगीण विकास हा नाना काटे यांच्या आजवरच्या सातत्यपुर्वक केलेल्या विकासकामांचे सर्वात मोठे उदाहरण आहे.
4. ‘लोकसहभागातून लोकपरीवर्तन’ या सूत्राप्रमाणे काम करत असताना सर्वांच्या अडचणी सोडविण्यासाठी नाना काटेंनी नेहमीच कटिबध्द राहण्याचा प्रयत्न केला आहे. या विकास कामांत नागरिकांचा नेहमीच त्यांना सक्रिय पाठिंबा राहिला आहे. लोकसहभागाशिवाय इतका प्रचंड विकास करणे शक्य नव्हते.
5. पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका बजावत असताना सातत्याने जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम नानांनी केले आहे. महापालिका सत्ताकाळात आणि सत्ता नसताना देखील त्यांना निवडून देणाऱ्या लोकांचे कुठलेही काम अडून राहणार नाही याची पुरेपूर काळजी नानांनी वेळोवेळी घेतली आहे.
6. शासनाच्या योजना, महापालिकेचे सर्व लाभ हे सर्वसामान्य नागरिकांना मिळायला हवेत हाच नाना काटे यांचा कायम प्रयत्न राहिला आहे.
7. गेली 20 वर्षे सक्रियपणे पक्ष संघटनेत करत असलेल्या आणि आजवर केलेल्या विकासकामांच्या जोरावर ही निवडणूक लढवत असल्यामुळे येथील सजग आणि सुज्ञ मतदार आपल्याला नक्कीच बहुमताने विजयी करतील, अशी नाना काटे यांना पूर्ण खात्री आहे.
8. चिंचवड शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक अशा प्रत्येक क्षेत्रात विकासाला केंद्रस्थानी ठेवून नाना काटे यांनी योगदान देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे.
9. युवक, बालक, महिला, ज्येष्ठ अशा सर्वांना सन्मानाचे जीवन लाभावे यासाठी नाना सदैव कटिबध्द राहिले. काम करत असताना कुठलाही भेदभाव न बाळगता सर्व जातीय, धार्मिक, भाषिक, प्रांतीय लोकांना समानतेने वागविल्याने सर्वांच्या साथीने विकासाचा नवा अध्याय लिहिण्यात त्यांना यश आले आहे.
10. कुठल्याही गैरप्रकाराला पाठीशी न घालता लोकाभिमुख व पारदर्शक कारभार हेच नाना काटे यांच्या आजवरच्या कामाचे ब्रीद राहिले आहे.