पिंपरी (Pclive7.com):- किवळे येथील एका लग्न समारंभात जेवणातील बासुंदीमधून १४ जणांना विषबाधा झाली आहे. यामध्ये एक महिलेची प्रकृती गंभीर असून एका रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी रात्री घडली.
किवळे येथील धर्मराज मंगल कार्यालयात कांबळे-बनसोडे यांचा काल विवाह होता. यावेळी जेवणातील बासुंदी खाल्ल्याने अनेकांना त्रास सुरू झाला. उलटी व चक्कर येण्याचे प्रकार होऊ लागले. या विष बाधेमध्ये चार महिला व तीन बालकांचा समावेश आहे. यातील एका महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून इतरांची प्रकृती स्थिर आहे. दुपारी अकराच्या सुमारास शेवटची पंगत झाली. या पंगतीत जेवण केलेल्या सुमारे १४ जणांना डोकेदुखी, मळमळ, उलट्या-जुलाब आदी त्रास होऊ लागल्याने सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना येथील आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील तिघांना उपचारानंतर सोडून देण्यात आले. तर इतरांवर उपचार सुरू आहेत.