कांदा खाल्ला नाही म्हणून कुणी मरणार आहे का? असा सवाल ही त्यांनी व्यक्त केला. कांदा प्रश्नावरून अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पडलं. म्हणून तुम्ही एवढे घाबरता का? असा सवाल करताना बच्चू कडू यांनी सरकारला केला आहे. शिवाय केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
मंत्री विजयकुमार गावित यांनी सौंदर्यावर बोलताना बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा संदर्भ दिला. यावेळी त्यांची जीभ घसरला. त्याचाही बच्चू कडू यांनी समाचार घेतला. मासे खाण्याच्या वक्तव्यावर बोलताना त्यांची तशी मानसिकता आहे. त्यामुळे ते तसे बोलले असतील, असं बच्चू कडू म्हणालेत.
खासदार नवणीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्येमध्ये विठ्ठलराव नामक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यावरही बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली नवनीत राणा यांना धमकीच्या मुद्द्यावर बोलताना ते कोण महत्वाचे आहे का? असा प्रती सवाल करत त्यांनी केला. पिंपरी चिंचवडमध्ये दिव्यांग विभाग आपल्यादारी या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड मध्ये आले असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.