पिंपरी (Pclive7.com):- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळ्याची आज सुरुवात होतेय. मात्र पहिल्याचं दिवशी आळंदीनगरी बंदची हाक स्थानिक ग्रामस्थांनी दिलीये. त्यामुळं लाखो वारकऱ्यांची गैरसोय होत आहे.
आळंदी देवस्थानच्या तीन विश्वस्तांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. यात योगी निरंजननाथ, ऍड. राजेंद्र उमाप आणि डॉ भावार्थ देखणेंचा समावेश आहे. मात्र स्थानिकांना पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे. म्हणूनच आळंदीकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी संजीवन समाधी सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी बंद पुकारून, सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
संत महंतांच्या दांड्यासह लाखो वारकरी आज अलंकापुरीत दाखल झाले आहेत. अशावेळी आळंदी बंद ठेवली गेली आहे. त्यामुळे वारकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. हे पाहता देवस्थानने आळंदीनगरी बंद ठेऊ नये, असं आवाहन ही केलेलं आहे.