“एका खासदाराने मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असते. एक खासदार माझ्याजवळ येऊन दीड वर्षापूर्वी माझ्याजवळ येऊन मला राजीनामा द्यायचा आहे असे सांगत होता. त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे. त्या खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचं रान केलं आहे. त्यांना खासगीत बोलवा. आता त्यांचे सगळं चाललेलं आहे. पण मधल्या काळात ते सहाही विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते. त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. त्यांनी मला आणि त्यावेळेसच्या वरिष्ठांना सांगितले होते की, मी राजीनामा देत आहे. मी कलावंत आहे. माझ्या सिनेमावर परिणाम होत आहे. माझा सिनेमा चालला नाही. अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या, असे अजित पवार म्हणाले.
निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे यांना उत्साह आला आहे. त्यामुळे पदयात्रा सुरु आहेत. कुणाला संघर्षयात्रा सुचते तर कुणाला पदयात्रा. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे. पदयात्रा काढा. मी पण सहा तालुक्यांमध्ये सांगतो कशी यांची भूमिका होती आणि गेल्या पाच वर्षात कितीदा त्यांना आपल्या मतदारसंघात पाहिलं आहे. त्यावेळेस उमेदवारी देत असताना योग्यपद्धतीने दिली होती. परंतु दोन वर्षातच तू ढेपाळला आणि तिसऱ्या वर्षी म्हणायला लागला मला राजीनामा द्यायचा. एकंदरीत चित्र बघून आम्ही उमेदवारी देत असतो. आता तिथे दिलेला उमेदवार निवडणूनच आणणार आहे,” असा इशारा अजित पवार यांनी दिला.