पिंपरीतील चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या मागील मैदानात आज बुधवारी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
‘आदित्य संवाद’ हा आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्रातील युवा वर्गाला जोडणारा एक नावीन्यपूर्ण असा संवादात्मक उप्रकम आहे. प्रत्यक्ष संवाद आणि भेटीगाठींच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवक वर्गाच्या आशा आकांक्षा जाणून घेण्याचा ठाकरे यांचा मानस आहे. महाराष्ट्रभर जाऊन आदित्य ठाकरे तरुणांशी मनमोकळा संवाद साधत आहेत. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून तरुणाईंच्या चौफेर प्रश्नांची उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिली आहेत. हा संपुर्ण राजकीय विरहित कार्यक्रम आहे.
राज्यात सुरू झालेल्या आदित्य संवाद या कार्यक्रमाचा समारोप आज पिंपरी-चिंचवड शहरात होणार आहे. शहरातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, तरुणांमी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे युवा सेनेने केले आहे.