मुंबई (Pclive7.com):- महाराष्ट्रातील आजवरची सर्वात मोठी खळबळजनक घटना घडली असून आज सकाळी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुट पाडली असून त्यांनी रात्रीत भाजपाला पाठिंबा दिला असून त्यातून सर्व प्रक्रिया बाजूला सारुन त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. हा सर्वांनाच धक्का आहे.