मुंबई (Pclive7.com):- आज पहाटेच संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारी घटना घडली आहे. सकाळी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र अजित पवारांनी याबाबत शरद पवार यांना कोणतीही माहिती दिली नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. मुंबई पत्रकार परिषदे दरम्यान ते बोलत होते. अजित पवरांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. या निर्णयाची कोणतीही माहिती शरद पवार यांना नसल्याचे राऊत यांनी सांगितले. मात्र अचानक झालेल्या या हाचालींमुळं महाराष्ट्रात मात्र राजकीय भूकंप आला आहे.
संजय राऊत म्हणाले की, आमच्या महाआघाडीमुळे देशाचे वातावरण बदलणार होते म्हणून अजित पवरांना फोडण्यात आले. रात्रीच्या अंधारात पाप होत असत, चांगली काम होत नाहीत. अजित पवरांनी शरद पवरांसह महाराष्ट्राला धोका दिला आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. तसेच शरद पवारांनी देखील यावेळी ट्विट करून अजित पवार यांनी घेतलेला निर्णय हा पक्षाचा नसून त्यांचा वयक्तिक निर्णय असल्याचे म्हंटले आहे.