पिंपरी (Pclive7.com):- निरंतर प्रयत्न केल्यास अपयशालाही हार मानावी लागते. अशक्य असे काहीच नसते.त्यासाठी कोणतीही आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण करणे गरजेचे असते. कारण जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास या तीन गोष्टी आपल्याजवळ असल्या की, जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नसते. प्रत्येक गोष्टीमधून वेगवेगळ्या नवनवीन गोष्टी यामुळे शिकावयास मिळतात.आपल्याला काय करायचं, आपली ध्येयं कोणती? त्यानुसार प्रयत्नांच्या पाऊल वाटांवर निडरपणे खंबीर राहणं महत्वाचे असते.याचे जिवंत उदाहरण म्हणजे लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब.
स्वत:च्या विशीष्ट कार्यशैलीने राजकारण व समाजकारणाच्या माध्यमातून अवघ्या भारत देशाच्या विकास प्रक्रीयेत महत्वाचा वाटा असणारे अष्टपैलू,सर्वसमावेशक व्यक्तिमत्व म्हणजे मा.शरदचंद्रजी पवार. त्यांच्या दैदिप्यमान कार्याची नवप्रेरणा मनी जागृत झाल्याशिवाय रहात नाही. बारामतीतील काटेवाडी या ग्रामीण भागात पिता गोविंदराव व आई शारदाबाई या शेचकरी कुटूंबात जन्म घेतलेल्या शरदचंद्र पवार यांना राजकारणाचं बाळकडू लाभलं.त्याच जोरावर त्यांनी शेती, सहकार क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून विकासाचा आलेख गतिमान ठेवला.
राजकारण-समाजकारण करीत काटेवाडी ते मंत्रालय आणि संसदेपर्यंतचा प्रवास मेहनतीने व जिद्दीने केला.शरदचंद्र पवार साहेब यांची शेतक-यांच्या प्रती नेहमीच आत्मियता राहिली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी कृषिक्षेत्रात अनेक अमुलाग्र बदल घडविले. विविध संकल्पना, शासकीय याेजनांमार्फत त्यांनी शेतक-यांचे हित जोपासले. साहेबांनी ग्रामीण भागातील महिलांना चुल व मूलापुरते मर्यादित न ठेवता त्यांना समाजकारण व राजकारणात सक्रियपणाने येण्याकरीता पाठबळ दिले. त्यांनी राज्यात महिला धोरणाची आखणी करीत ३०% जागा राजकारणात राखणाकरीता पाठपुरावा केला. पुढे या धोरणात बदल करीत पुन्हा महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत ५०% इतक्या जागा देण्यात आल्या. साहेबांच्या क्रांतिकारी उल्लेखनीय कार्यामुळे महिलांना गाव, तालुका, जिल्हा राज्य व केंद्रातही स्वत:ला सिध्द करता आले. महिलांनी घराचा उंबरठा ओलांडत विधानसभेत व संसदेत आपल्या कार्यशैलीचा एक अनोखा ठसा उमटवित देशाच्या विकास प्रक्रीयेत सहभागी झाल्या.
साहेब कितीही व्यस्त असले तरी तळागाळातील सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला वेळ देतात, त्याचे म्हणणे एकून घेतात. वेळ, बुद्धी, श्रम, कौशल्य हे ‘पंचदान’ देणारा, उदारमतवादी भुमिका असलेला सर्वसमावेशक द्रष्टा नेता आपल्या देशाला लाभला.शितबध्द दैनंदिनी व नियोजनबध्द आखणी म्हणून पवार साहेबांना ओळखले जाते. सर्वसामान्यांसाठी अहोरात्र झटणा-या दिग्विजयी नेत्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
✍ -अमित राजेंद्र बच्छाव
(उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिं.चिं. शहर)