पिंपरी (Pclive7.com):- पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहनांची संख्या वाढल्याने आज सकाळपासूनच पुण्याकडे जाणार्या मार्गावर खंडाळा बोर घाटातील अमृतांजन पुलापासून जवळपास तीन किमी अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली आहे.
शुक्रवारी रात्रीपासून या मार्गावर वाहनांची गर्दी वाढल्याने वेग मंदावला होता. त्यातच अनेक मोठी अवजड वाहने वाढल्याने वाहतूक कोंडीत भर पडली होती. शनिवार व रविवार अशा दोन दिवस सुट्टया असल्याने अनेक पर्यटक फिरायला जाण्याचा बेत आखत सकाळच्या सत्रात घराबाहेर पडल्याने वाहनांची संख्या वाढून एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे.