पिंपरी (Pclive7.com):- रणरागिणीचा त्रिशूल तू, पवार-सुळे घराण्याची ज्योत तू, दीन-दलितांना देऊन आधार, समाज मनातील वात तू..!
“साधी राहणी उच्च विचार” हे वाक्य सुप्रियाताईंना अगदी तंतोतंत जुळते आहे. आज देशाच्या संसदेत ज्या युवा पिढीने प्रवेश केला आहे, त्यामध्ये ताईंचा समावेश अग्रगणी आहे. अनेक वर्ष त्या उत्कृष्ट सांसदपटू म्हणून संसदेत उल्लेखनीय काम करित आहेत. एकच ध्यास महिलांचा विकास, एकच ध्यास बहुजनांचा विकास, महाराष्ट्रा बरोबर देशाच्याही विकासाचे स्वप्न ह्दयाशी बाळगणारे उदयोन्मुख नेतृत्व म्हणजेच सुप्रियाताई सुळे..! खर तर सुर्याला मी तेजस्वी आहे असे सांगावे लागत नाही. हि-याला मी रत्नं आहे असे सांगावे लागत नाही. जगाच्या नकाशावर बारामतीच्या व शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कोंदणात विराजमान झालेल्या हि-याची महती सुर्यासारखी तेजस्वी, चंद्रासारखी कोमल व शितल आहे हे कुणी सांगायला हवं का?
मी गेली वीस वर्षे यशवंतराव चव्हाण आश्रमशाळा भोसरी येथे शालेय समिती सदस्य म्हणून कार्यरत आहे. सुप्रियाताई स्वता: जातीने या संस्थेवर लक्ष ठेवून असतात. भटक्या विमुक्त जाती जमातींच्या मुलांच्यावर जातीने लक्ष घालून काय हवे नको ते विचारत असतात. सामाजिक कार्यात अग्रेसर असणा-या ताईंची ओळख झाली ती याच संस्थेमुळेच, सुप्रियाताईंचा सामाजिक कार्याचा व्याप इतका मोठा आहे की राजकारणातील व्यक्ती असे कार्य करू शकत नाही. पण ताई प्राधान्याने सामाजिक कार्याकडे आवर्जून लक्ष देतात. त्यांच्या याच कार्याची प्रेरणा घेऊन मी काही दिवस सुप्रियाताई सुळे युवा फाऊंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर विविध अभियानांच्या माध्यमातून कार्य करीत राहिलो. सुप्रियाताईंनी सुद्धा माझ्या या कार्याचे मनापासून कौतुक केले, वेळोवेळी पत्रे पाठवून शुभेच्छा दिल्या त्याच शुभेच्छांच्या जोरावर मी अनेक सामाजिक उपक्रम राबविले.
लोकसभेची निवडणूक होती, ताईंना राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने बारामती लोकसभेसाठी उमेदवारी मिळाली होती. प्रचाराची सुरवात हवेली तालुक्यातील बहुली या गावी होती. मी आवर्जून प्रचाराठी बहुली येथे गेलो होतो. विविध गावातील कार्यकर्ते महिला भगिनी तेथे उपस्थित होते. ताईंना पहाण्यासाठी व त्यांचे विचार ऐकण्यासाठी खुपच गर्दी झाली होती. ताईंना भेटून सुद्धा खुपच वर्षे झाली होती. माझ्या मनात विचार येत होता इतक्या गर्दीत ताई आपल्याला ओळख देतील का? इतक्यात ताईंची गाडी आली सर्व कार्यकर्ते गाडीकडे धावत गेले. अनेक कार्यकर्त्यांच्या गराड्यात ताई दिसेनात, इतक्या गर्दीतून वाट काढीत सर्वांना अभिवादन करीत सुप्रियाताई स्टेजवर गेल्या, इतर मान्यवरांची भाषणे झाली. ताईंचे भाषण सुरू झाले, पहाता पहाता या भाषणाने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत गेला आणि ताईंच्या नावाच्या घोषणा सुरु झाल्या. धडाकेबाज भाषणांने आलेल्या सर्वांचे हदय ताईंनी जिकूंन घेतले होते. सभा संपल्यावर ताई गाडी कडे जाण्यास निघाल्या आणि सहज त्यांचे लक्ष माझ्या कडे गेले, एवढ्या गर्दीतून ताईंनी मला बोलविले, क्षणभर मला काहीच सुचेना. ताईंच्या जवळ गेलो त्यांनी माझी आवर्जून विचारपूस केली. मला तर आभाळच ठेंगणे झाले होते, इतक्या वर्षांनी भेटून सुद्धा आपण आठवणीत राहिलो हेच खुप मोठे माझ्यासाठी, शरदचंद्रजी पवार साहेबांचे सर्वच गुण तंतोतंत सुप्रियाताईंमध्ये आहेत असे सर्व जमलेल्या कार्यकर्त्यांना त्या वेळेस जाणवले असणार हे नक्कीच.
सुप्रियाताईंच्या कामाची पद्धत व्यापक आहे. शहरी व ग्रामीण भागाला समान न्याय देणारी ताई एक न्यायपीठच वाटतात. सहज कोणालाही भेटणा-या ताई एक कुटुंब प्रमुख वाटतात. महिला सबलीकरण, महिला बचत गट, वंचिताना शिक्षण, स्त्रीभ्रृण हत्या, आरोग्य सुविधा, रस्ते पाणी या साठी सुप्रियाताई सतत प्रयत्नशील असतात. शिक्षणाशिवाय समाजाचा विकास होऊच शकत नाही हे जाणून समाजातील दुर्बल वंचित भटक्या विमुक्तांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेऊन अनेक शिक्षण संस्थांना मदत करीत आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी व उन्नतीसाठी बचतगटांची स्थापना करून त्या थांबल्या नाहीत तर बचत गटातून तयार होणा-या विविध प्रकारच्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून ठिकठिकाणी विक्रीकेंद्र उभारली त्या मुळे आपोआप महिलांची प्रगती झाली. स्त्रीभ्रृण हत्या रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.. जनजागृती केली… युवती काँग्रेसच्या माध्यमातून अनेक मुलींना सन्मानाचे व्यासपीठ दिले, नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या माध्यमातून अनेक युवकांना आपल्या स्वबळावर उभे राहण्यासाठी दिशा दिली.. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान च्या माध्यमातून साहित्य कला संस्कृती ही जोपासण्याचे कार्य ताई जोमाने करीत आहेत. संसदेतील अधिवेशनात संबंधित खासदारांचा विविध चर्चांतील सहभाग, सभागृहात परिणामकारकरीत्या प्रश्न उपस्थित करून त्याचा केलेला पाठपुरावा, सभागृहात त्यांनी मांडलेली खासगी विधेयके आणि आपल्या मतदारसंघात खासदार निधीचा केलेला योग्य वापर या निकषांवर ‘संसदरत्न’ पुरस्कारासाठी ताईंची निवड दरवर्षी होते. ८०% टक्के समाजकारण २०% राजकारण हे ताईंचे “ब्रीदवाक्य” याच निष्कर्षावर ताईंचे सामाजिक व राजकीय वाटचाल समर्थ पणे अबाधित सुरू आहे. आज सुप्रियाताई सामाजिक व राजकीय कार्यात उंच शिखरावर विराजमान आहेत तरी त्यांचे पाय जमीनीवर आहेत. ३० जून सुप्रियाताईंचा वाढदिवस या शुभ दिवसाचे औचित्य साधून ताईंना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. सुप्रियाताई महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होवोत अशा मनपूर्वक सदिच्छा देतो..
संदिप राक्षे ✍🏻
(प्रदेश सरचिटणीस) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभाग ८६५७४२१४२१ भोसरी पुणे २६