मुंबई (Pclive7.com):- भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. जगताप आणि टिळक यांच्या ऐवजी मतपत्रिका दुसऱ्या कोणीतरी मतपेटीत टाकल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
राज्यसभेच्या निवडणुकांप्रमाणेच विधानपरिषदेच्या वेळीही भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप मतदानासाठी विधानभवनात दाखल झाले होते. कर्करोगाशी झुंज देणाऱ्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी सकाळी मतदानचा हक्क बजावला, त्यानंतर आजारी असलेले आमदार लक्ष्मण जगताप यांनीही मतदान केले.
मात्र, लक्ष्मण जगताप यांची मतपत्रिका त्यांच्याऐवजी इतर कोणीतरी मतपेटीत टाकल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. मुक्ता टिळक यांच्याही मतावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.
आता निवडणूक आयोग या आक्षेपाबाबत काय निर्णय घेतो हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. मात्र जगताप आणि टिळक यांच्या मतदानावरील आक्षेप म्हणजे असंवेदशीलतेचा कळस असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.