पिंपरी (Pclive7.com):- भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आयोजित करण्यात आलेल्या या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी आपले विचार मांडले. आयुष्यभर विद्यार्थ्याच्या भूमिकेत वावरत ज्यांनी जातीव्यावस्थेचे जोखड झुगारून लोकशाहीची बूज राखले अशा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६१ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन करतांना समतेचा लढा तीव्र करण्याचा निर्धार यावेळी अमित बच्छाव यांनी केला अमित बच्छाव यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झालेल्या या अभिवादन सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी गणेश सर्वगोड, रवी राठोड, जगदिश पाटील, आकाश शिंदे सतीश कदम, राजू वऱ्हाडी, सुनिल सोनवणे, सोमनाथ बोलके, शशिकांत जाधव, हर्षद पाटील, अक्षय हांडे, अमोल लांडगे, अाकाश शिंदे आदी उपस्थित होते.