महाराष्ट्राच्या तृप्तराज अतुल पांड्या आणि ऐन्जल विजय देऊकुळे या दोघांना बाल शक्ती पुरस्काराने सम्मानीत करण्यात आले. याव्यतिरिक्त २४ विद्यार्थी, २ वैयक्तीक आणि ३ संस्थांनाही हा पुरस्कार देण्यात आला. बाल शक्ती पुरस्कार आधी राष्ट्रीय बालक पुरस्काराने ओळखला जात होता. नाविण्यपूर्ण प्रयोग, समाज कार्य, अभ्यासू, क्रीडा, कला आणि संस्कृती तसेच शौर्य दाखवणाऱ्या बालकांना हा पुरस्कार प्रदाण करण्यात येतो.
तृप्तराजला कला आणि संस्कृती या विभागात तर एन्जेल हीला क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगीरी केल्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. स्मृतीचिन्ह, १ लाखांपर्यंत रोख, १० हजारांचे बुक व्हाऊचर्स आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ही बालके गणराज्य दिनाच्या विशेष परेडमध्येही सहभागी होणार आहेत.