पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात आज मनोमिलन झाले. या दोघांमध्ये झालेल्या समेटचा राष्ट्रवादी काँग्रेसने सडकून समाचार घेतला आहे. यांना कशी लाज वाटत नाही..? अशा शब्दांत जगताप-बारणे यांच्या मनोमिलनावर पत्रकार परिषदेत टिका करण्यात आली आहे.
पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक डब्बू आसवानी आदी उपस्थित होते.
प्रशांत शितोळे म्हणाले की, २००९ साली लोकसभा निवडणुकीच्या वेळेस अशाच पध्दतीने आझम पानसरे यांच्यासह मांडवली करण्यात आले होते. यावेळेसही त्याच ठिकाणी अमर मुलचंदानी यांच्या कार्यालयात ही मांडवली झाली आहे. तिथे झालेले कुठलेच निर्णय आजपर्यंत टिकले नसलाचा इतिहास आहे. भाजपावर शिवसेनेने केलेले भ्रष्टाचाराचे आरोप आता कसे चांगले झाले. त्या भ्रष्टाचारातही यांचे मनोमिलन झाले का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, गेली १० वर्षे एकमेकांवर आरोप करून आता एकत्र कसे होऊ शकतात. फोटोवरचा खासदार असे आरोप जगताप बारणेंवर वारंवार करायचे. त्याचं आता काय झालं..?