पिंपरी (Pclive7.com):- थेरगाव परिसरातील गुजरनगर, कन्हैय्या पार्क, साई पार्क, बेलठिकानगर, पडवळनगर या भागात गेल्या ६ महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना अनेकदा तक्रारी करूनही वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे तातडीने योग्य ‘त्या’ उपाययोजना करून परिसरातील वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरण कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा नगरसेविका माया बारणे यांनी दिला आहे.
या समस्येसंदर्भात नगरसेविका माया बारणे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या ६ महिन्यांपासून गुजरनगर, कन्हैया पार्क, साई पार्क, बेलठिकानगर, पडवळनगर परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. याबाबत महावितरणचे कनिष्ठ अभियंता, उपअभियंता यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. तरी देखील परिसरातील वीज पुरवठा सुरळीत होत नाही. तरी तातडीने लक्ष घालून योग्य त्या उपाययोजना करून येथील वीज पुरवठा नियमित करावा. अन्यथा परिसरातील नागरिकांसह महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा माया बारणे यांनी दिला आहे.