पिंपरी (Pclive7.com):- प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली होती. या मुद्द्यावरुन वाद पेटण्याची शक्यता असतानाच या वादात शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी उडी घेतली आहे.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2020/01/IMG-20200101-WA0009-1024x512.jpg)
महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचे चित्ररथ यावेळी प्रजासत्ताक दिनी दिसू नयेत या मागे राजकीय षडयंत्र आहे काय? आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का? असा सवाल करत दाखले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.
महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात नेहमीच देशाचे आकर्षण ठरत आला. अनेकदा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचा आहे. हे काँग्रेस राजवटीत घडले असते तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती. आज गप्प का? असंही युवराज दाखले म्हणाले आहेत.