पिंपरी (Pclive7.com):- मावळ तालुक्यातील शेतकरी, नागरिक यांसह पिंपरी-चिंचवड शहर वासियांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मावळासह पिंपरी-चिंचवड महानगराची तहान भागविणारे पवना धरण ५० टक्के भरले आहे. आज (दि.२४) मंगळवारी दुपारी १२ वाजता घेतलेल्या आकडेवारीनुसार पवना धरणाने पन्नाशी ओलांडली असून पवना धरणात ५०.७८ टक्के पाणीसाठा जमा झाला होता.
पवना धरण क्षेत्रात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरण आज ५१ टक्क्यांच्या जवळपास पोहोचले. गेले आठवडाभरपासून पवना धरणाच्या बॅक वॉटर भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली असून ओढे, प्रवाह दुथडी भरून वाहत आहेत. पाण्याची आवक अशीच राहिल्यास आणि पावसाचा असाच जोर कायम राहिल्यास येत्या काही दिवसात पवना धरण १०० टक्के भरून नागरिकांना दिलासा मिळेल.