पिंपरी (Pclive7.com):- मा.उपमहापौर तुषार हिंगे आयोजित आरंभ सोशल फाउंडेशनच्या वतीने व आकाश इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी गुणगौरव समारंभ पार पडला. सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी आपली नाव नोंदणी केली होती. या प्रत्येक विद्यार्थास प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, बॅग, टीशर्ट, पुस्तके देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने आकाश इन्स्टिट्यूट यांच्या वतीने दहावी व बारावी नंतर पुढे काय केले पाहिजे या वर विद्यार्थ्यांना सेमिनार चे आयोजन करण्यात आले होते. त्याचे बरोबर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्ताने सहायक आयुक्त शिक्षण अधिकारी महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे शहराचे अनिलजी गुंजाळ सर यांचे उत्तम असे मार्गदर्शन सर्व विद्यार्थी मुलांना लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाने नक्कीच विद्यार्थांना पुढील वाटचालीस चालना मिळेल. अनिलजी यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.