भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी प्रात:कालापासून माध्यान्हापर्यंत कोणत्याही वेळी श्रीगणेशाची स्थापना व पूजा करता येते. त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, विष्टिकरण आदी वर्ज्य नाहीत. श्रीगणेश चतुर्थीच्या आधी एक दिवस किंवा त्याच दिवशी सकाळी मूर्ती आणावयास पाहिजे, असा नियम नाही, असे दाते यांनी स्पष्ट केले आहे.
गणेशाची स्थापना आजच करा..
महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आदी सर्व प्रदेशांत सर्वत्र मंगळवारीच श्रीगणेश चतुर्थी आहे. सोमवारी (दि. १८) तृतीया समाप्ती दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी असून, दुसऱ्या दिवशी (दि.१९) चतुर्थी समाप्ती दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी आहे. शास्त्रीय वचनाप्रमाणे मंगळवारी चतुर्थी संपूर्ण माध्यान्हव्यापिनी असल्याने आणि मंगळवार असल्याने या दिवशी पंचांगात दिलेली श्रीगणेश चतुर्थी योग्यच आहे, असे मोहन दाते यांनी सांगितले.