पिंपरी (Pclive7.com):- जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे CRPF जवानांच्या गाडीवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये शहिद झालेल्या जवानांना पिंपळे सौदागरमध्ये निलेश काटे युवा मंचच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आठवडे बाजारातील शेतकऱ्यांचे एक दिवसाचे उत्पन्न शहिद जवानांच्या कुटूंबियांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
१४ फेब्रुवारीला जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे CRPF च्या जवानांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात ४४ जवान शहिद झाले. या हल्ल्याचा सर्वच स्तरातून तीव्र निषेध होत आहे. आज पिंपळे सौदागर येथील निलेश काटे युवा मंचच्या वतीने या हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी परिसरातील अनेक सोसायट्यामधील नागरिक सहभागी झाले होते. उपस्थितांनी मेणबत्त्या पेटवून शाहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी युवा नेते निलेश काटे यांच्यावतीने आयोजित होत असलेल्या आठवडे बाजारातील शेतकऱ्यांनी देखील यात सहभाग नोंदविला. राम कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे एक दिवसाचे उत्पन्न शहिद जवानांच्या कुटूंबियांना देण्याचा निर्णय घेतला.
शाहिद जवान अमर रहे, भारत माता कि जय, भ्याड हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा धिक्कार असो.. अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.