पिंपरी (Pclive7.com):- तेव्हाचा सुमारे ४० वर्षांपुर्वीचा काळ… साधारणतः ८० च्या दशकाचा काळ होता… ब्लॅक अँण्ड व्हाईट चा तो जमाना…. डिजीटल जगापासून संपुर्णतः लांब.. दुरदर्शन आणि आकाशवाणी, खेळणे, पारावर गप्पा मारणे, एकमेकांना भेटणे, नातेवाईकांची आस्थेवाईकपणे चौकशी करणे, शेजार्यांना मदत करणे, लोकनाट्यसंगीत, संगीत नाटक, चित्रपटगृहे, नाटके, दशावतार, नाट्यगृहे, कुस्तींचे फड, बैलगाडा शैर्यती, ऊरूस, जत्रा, मैदानी खेळ, महाराष्ट्राची लोककला, पारंपारीक वेशभूषा केलेले वासुदेव, नंदीबैल, गोंधळी, पहाटेच्या वेळीस जात्यावरच्या ओव्या, किर्तन, काकडा आरती, सायकल, काही दुचाकी, चारचाकी, डबल डेक्कन, सिंहगड एस्पप्रेस, लोणावळ्याचे निसर्ग रम्य ठिकाण, कोकण, मामाच्या गावाला जाऊया अशी गाणी असा एकंदरीत सुवर्णकाळच तो!. दुरदर्शनवर मराठी बातम्या, रामायण, महाभारत, अशा धारावाहीक पाहणे, छायाचित्र, चित्रवाणी असे मनोरंजनात्मक कार्यक्रम पहात ‘अमीन सयानींच्या भारदस्त आवाजात ‘मेरे प्यारे फौजी भाईंयों’ ह्या आकाशवाणीवरील फर्माईशची गाणी ऐकणे, एकत्रीत कुटूंब पध्दतीत माणसे रमत असत.. गावे, खेडे व काही प्रमाणात शहर असे पिंपरी-चिंचवडचे त्यावेळचे संमिश्र स्वरूप होते. बर्याच गावात ग्रामपंचायती होत्या तर पिंपरी-चिंचवड शहर नगरपालिका म्हणून विस्तारत होते.
तेव्हा आकाशवाणी/रेडीओ वरील बाताम्यांमध्ये पिंपळे-गुरव व आजुबाजुच्या गावांचा पिंपरी चिंचवड नगरपालिकेत समावेश होणार आहे असे सांगितले गेले. ही बातमी ऐकताच पिंपळे-गुरवमधील २४ वर्षांच्या एका तरूणाच्या तोंडातून सहज एक वाक्य उच्चारले गेले आणि त्या वाक्यानंतर गेली ३५ वर्षे त्या तरूणाभोवती पिंपरी-चिंचवड शहराचे राजकारण फिरत आहे आणि त्या तरूणाने उच्चारलेले ते मौल्यवान वाक्य म्हणजे… पिंपळे-गुरवच्या सर्वांगिण विकासासाठी पिंपळे गुरवचा सर्वप्रथम नगरसेवक मी होणार.. आणि ते वाक्य उच्चारणार्या तरूणाचे नांव होते लक्ष्मण पांडुरंग जगताप…!
२० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण ह्या सुत्रानुसार गेली ३५ वर्षे विविध क्षेत्रात लोकोपयोगी कार्य करीत लोकांच्या मनावर देखील अधिराज्य गाजविणारे पिंपरी चिंचवडचे एकमेव स्थानिक नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. कार्यकत्यांमधील विविध गुण हेरून त्यांना त्या त्या पद्धतीच्या पदांवर तर त्यांनी संधी दिलीच व त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे कार्यकत्यांना स्वतःच्या पायावर उभे रहा, आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हा, कुटूंबाची काळजी घ्या, समाजकारण करा मगच राजकारणाचा विचार करा असा नुसताच सल्ला देत नाहीत तर त्यांना शेवटपर्यंत आवश्यक ती सर्व मदत करण्याचे माझे कर्तव्य आहे, ह्या ध्येयानेच लक्ष्यमणभाऊ कार्यरत असतात. अनेक संघर्ष करीत, अनेक अवघड गोष्टींतून वाट काढीत, सामाजिक, राजकीय वार झेलीत एका विशिष्ट उंचीवर स्वतःला कायमस्वरूपी सिध्द करून दाखविण्याचे शिवधनुष्य त्यांनी यशस्वीपणे पेलले आहे. राजकारण, सामाजिक क्षेत्र, सहकार क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, उद्योग क्षेत्र, कला व सांस्कृतीक क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांंमध्ये त्यांनी आपला ठसा कायम स्वरूपी उमटविला आहे.
स्वामी रामदेवजी महाराज यांच्या योग विज्ञान शिबिराचे आयोजन करून हजारो लोकांना त्या शिबिराचा लाभ मिळवून दिला. विश्वसंत सद्गुरू कै. वामनरावजी पै यांचा ‘शहाणपण देगा देवा’ या विषरावर आनंद मेळाव्याचे हजारोंच्या साक्षीने यशस्वी आयोजन केले. परमपुज्य श्री.श्री. रविशंकरजी यांंचा ‘ज्ञानगंगा’ व प्राणायम, ध्यान शिबिर या विषयावर कार्यक्रमाचे हजारो साधक व सर्वसामान्य जनतेसाठी यशस्वी अयोजन केले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त तसेच आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून मोफत महाआरोग्य शिबिराचे भव्य आयोजन करून लाखो रूग्णांना मोफत अथवा नाममात्र दरात सरकारी तसेच नामवंत खाजगी रूग्णालयात योग्य ते उपचार मिळवून देऊन त्यांचा दुआ मिळविण्याचे दुर्लभ काम लक्ष्मणभाऊ दरवर्षी करीत आहे.
कोरोना व्हायरस अर्थात कोविड-19 च्या जगतील अत्यंत कठीण काळात शहरातील नागरिकांना दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तु अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकत्यांचे सुयोग्य जाळे निर्माण केले व लोकांना धीर देत औषधे, मास्क, सॅनिटायझर, साबण यांचा पुरवठा तर केलाच परंतु कोरोनाशी दोन हात करण्याासाठी एकमेकांत सुयोग्य अंतर राखा, मास्कचा वापर करा, सॅनिटायझर अथवा साबणाने हात स्वच्छ ठेवा, लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा अशी जनजागृती करीत लोकांना कोरोना व्हायरसपासून वाचवायचेच ह्याच ध्येयाने दिवस रात्र काम करीत हजारो विद्यार्थी, कामगार, जेष्ठ नागरिक, महिला तसेच इतर प्रांतातील मजदूर ज्यांच्याकडे जेवणाची सोय नव्हती त्यांना दररोज दोनवेळचे जेवण उपलब्ध करून दिले. अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान ही उक्ती खरी करून दाखविली पण त्याचे श्रेय घेण्याचे मात्र टाळले. माझी जनता… माझे कुटूंब या प्रमाणे लाखो लोकांची कुटूंबाप्रमाणे काळजी घेतली. त्यांचे आशिर्वाद कायमस्वरूपी भाऊंच्या पाठीशी उभी राहणार यात तिळमात्र शंका नाही.
प्रतिभा महिला प्रतिष्ठाणच्या माध्यमातुन हजारो महिला बचत गटांची उभारणी करून महिला सक्षमीकरणात स्वःताच्या कुटूंबातील महिला, नगरसेविका, नगरसेवक, कार्यकर्त्यांच्या मदतीने मोलाचा वाटा उचलला. राजकारण, समाजकारण करीत असताना पहाटे लवकर उठुन तालीम करणे, जिमला जाणे, योगा करणे, चालणे, पळणे, सायकलींग करणे, घोडेस्वारी करणे, योग्य आहार घेणे अशा पध्दतीने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन ‘सर्व रोगांची निर्मिती पोटातुन होते’ डॉक्टरांनी सांगितलेल्या या वाक्यावर अभ्यास करून आश्चर्यकारक पध्दतीने कित्येक किलो वजन कमी केले. तसेच त्यांच्या कुटूंबातील सदस्यदेखील त्यांचे अनुकरण करीत आहेत. त्यांचा आदर्श घेऊन अनेकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे चालु केले व वजन कमी करण्याची, व्यायाम करण्याची सर्वामध्ये एक प्रकारची स्पर्धाच लागली.
नेता तसा कार्यकर्ता ह्या नात्याने भाऊंच्या निर्व्यसनी जीवनपध्दतीचा अवलंब अनेकांनी केला आहे. एकत्र जीवन पध्दतीने अनेक फायदे असतात ह्या प्रमाणे आजदेखील भाऊंनी स्वतःचे घर, कार्यकत्यांचे घर, एकत्र जीवन पध्दतीचे ठेवण्यावर अधिकाधिक भर दिला आहे. आई कै.चंद्रभागा व वडील कै. पांडुरंगजी जगताप यांचे संस्कार, पुण्याई त्यांंनी लावलेले वळण, त्यांचे ऋण, उपकार ह्या जन्मी तरी फेडता येणार नाही. ह्याचे भान ठेवत त्यांची मुर्ती कायम डोळ्यांसमोर रहावी, त्यांचा विसर कोणत्याही परिस्थितीत होऊ नये म्हणुन घराला तसेच व्यवसाय कार्यालयाला ‘चंद्ररंग’ नाव देऊन पुत्रधर्म पाळण्याचा पुरेपुर प्रयत्न भाऊं करीत आहेत.
अशा सर्वगुण संपन्न, स्वकतृत्वाने, स्वहिंमतीने यशाची एकएक पायरी मोठ्या कष्टाने चढणारे हे अवाक करणारे रसायन; हे एक आदर्श व्यक्तीमत्व, सुर्य, चंद्र, तारे, काजवे हे स्वयंप्रकाशित असतात. अशाच ह्या स्वयंप्रकाशित दिव्यत्वाला आज गणेश जयंती दिवशी असणार्या त्यांच्या वाढदिवसाला आमच्या नतमस्तक होऊन अनेक शुभेच्छा!
* सन 1986 ते सन 2006 पर्यत सलग 21 वर्षे पिंपरी-चिंचवड मनपाचे नगरसेवक.
* सन 1993 साली पिंपरी-चिंचवड मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष.
* सन 2000 साली पिंपरी-चिंचवड मनपाचे महापौर.
* सन 2002 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष.
* सन 2004 साली विधानपरिषदेवर बहुमताने आमदार म्हणून निवड.
* 2009, 2014, 2019 सलग तीनवेळा चिंचवड विधानसभा मतदार संघातून विधानसभा सदस्य म्हणून बहुमताने आमदारपदी निवड.
* महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करून अनेक खेळाडुंना प्रोत्साहन व शासनाकडून तसेच स्वतःदेखील आर्थिक अथवा इतर बाबतीत नावारूपास येण्यास योग्य ती मदत केली.
* महाराष्ट्रातील अनेक नामवंत किर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते यांच्या माध्यमातुन धार्मिक कार्यक्रमांचे दरवर्षी आयोजन केले.
* पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत नव्याने तहसील कार्यालयाची निर्मिती करून घेतली.
* जिल्हा रूग्णालय औंध येथील इमारत व्यवस्थित करून अद्ययावत यंत्रणांनी शासनाकडे पाठपुरावा करून सुसज्ज केली. अनेक गरिब, गरजु रूग्ण तिथे उपचार घेऊन बरे झाले आहेत.
* जे.एन.एन.यु.आर.एम. अंतर्गत महापालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातुन, रस्ते, पुल, भुयारी मार्ग, आरोग्यविषयक विकासकामे करण्यासाठी हजारो कोटींचा निधी उपलब्ध करून नागरिकांच्या मुलभूत गरजां पुर्ण होण्यासाठी व नागरिकांचे आयुष्य सुजलाम-सुफलाम होण्यासाठी आग्रही भुमिका घेत आहे.
* दरवर्षी दिवाळी पहाट, दिपोत्सव विविध क्षेत्रात कार्यरत असणार्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येतो.
* देशाच्या सिमेवर व देशावर येणार्या संकटांचा मुकाबला करणार्या सैनिक, महार रजिमेंटला 75 वर्ष तसेच मराठा 2 बटालियनला 250 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या कुटूंबाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सैनिक पत्नी व माता यांचा यथोचित हृदय सत्कार करण्यात आला.
* सांगवी, नवी सांगवी, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रावेत, कस्पटेवस्ती, मामुर्डी, किवळे, पिंपळे निलख, जवळकर नगर, वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव, चिंचवडस्टेशन, थेरगाव, काळेवाडी आदि भागांसह पिंपरी-चिंचवड मधील अनेक ठिकाणांचा विकास केला. परदेशातील विकासशील देशांतील ठिकाणांशी तुलना होऊ शकेल अशा विकासकामांची निर्मिती केली.
* लहान मुले, वृद्ध नागरिक, महिला, विद्यार्थी अशांसाठी विरंगुळा व्हावा तसेच फिरण्यासाठी व शुद्ध हवा घेण्यासाठी व्यायाम, योगा, जॉगिंग करण्यासाठी अनेक ठिकाणी उद्यानांची निर्मिती केली. भाऊ, तुम्ही निर्माण केलेल्या पाऊल वाटेवर अनेकजण चालत आहेत! स्वच्छ चारित्र्याचा, आरोग्य संपन्न जीवनाचा मार्ग धरत आहेत!!
– एक भाऊ समर्थक