पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना यासाहित विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. या सर्व योजनांचा ज्येष्ठांनी लाभ घ्यावा असे आवाहन संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष आनंद बनसोडे यांनी केले.
आकुर्डी येथील आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेच्या वेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष आण्णा कुऱ्हाडे, आकुर्डी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजित शितोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस इखलास सय्यद, मोहिनी टेकवडे, प्रकाश परदेशी, आशा शिंदे, अलका कांबळे, गीता सुतार आदी उपस्थित होते.
यावेळी बनसोडे यांनी विविध योजनांची माहिती दिली व मार्गदर्शन केले. इखलास सय्यद, प्रकाश परदेशी, मोहिनी टेकवडे, ज्ञानेश्वर ननावरे यांनी ही मनोगत व्यक्त केले.
यावेळी नोव्हेंबर महिन्यातील ज्येष्ठांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच महिला भगिनींना साडी वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल शितोळे यांनी परिश्रम घेतले. तर सूत्र संचालन सुभाष चौधरी यांनी केले.