पिंपरी (Pclive7.com):- शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. विचित्र विधाने करून ते तमाम हिंदूंच्या भावना दुखावत आहेत. अशा विकृतींना जनताच धडा शिकवेल असे मत भाजपाचे पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांनी व्यक्त केले आहे.
अमित गोरखे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जितेंद्र आव्हाड यांनी केलेले प्रभू श्रीराम अपशब्द अत्यंत क्लेशदायक असून हे विधान अत्यंत मूर्खपणाचे आहे. वाल्मिकी रामायणापासून कुठल्याही चौदा रामायणमध्ये प्रभू रामचंद्र मांसाहारी होते, असा उल्लेख नाही. उलट प्रभू रामचंद्र फळ, मूळ, कंदमूळ खाऊन 14 वर्ष वनवासात राहिलेत असाच उल्लेख आहे. आव्हाड यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे, त्यांना उपचारची गरज आहे असे विधान करून ते तमाम हिंदू च्या भावना दुखावत आहे.
देशभरात सर्वत्र सध्या प्रभू श्रीरामांचे वातावरण बघून अनेक मंडळी बिथरली आहेत, त्यातलाच हा एक भाग आहे. आव्हाडांचे विकृती मानसिकता आणि श्रीरामाचा अपमान करण्याचा प्रयत्न जनतेने अनेक वेळा अनुभवला आहे. संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या श्रीराम प्रभूंच्या बाबतीत अशी विकृत वक्तव्य कोणीही सहन करणार नाही व जनताच येणाऱ्या काळात अशा मंडळींना धडा शिकवेल असे अमित गोरखे यांनी म्हटले आहे.