आळंदी (Pclive7.com : प्रसाद बोराटे):- आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचालित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनि. कॉलेज आळंदी देवाची यांच्या संयुक्त विद्यामानाने रक्षाबंधन उपक्रम उत्साहत संपन्न झाला. कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, विश्वस्त प्रकाश काळे, उद्योगपती राजू नहार, संस्था सदस्य अजित मधवे, संस्था सदस्य धनंजय काळे पालकशिक्षक संघाच्या उपाध्यक्षा भाग्यश्री धायरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात माऊलींच्या प्रतिमेच्या पुजनाने झाली. श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनि. कॉलेजतील अंध युनिटच्या मुलींनी ईशस्तवन सादर केले.
मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी प्रास्ताविकामध्ये सहशालेय उपक्रमांतून भारतीय परंपरांची माहिती देत, प्रशालेत संस्कारयुक्त शिक्षण दिले जाते म्हणून विद्यार्थी कुठेही कमी पडत नाही. बहिणीची काळजी घ्यावी, भाऊ-बहिणीच नाते अतूट राहिले पाहिजे. झाडांना राख्या बांधल्या जातात, यातून पर्यावरण रक्षण करण्याचा संदेश दिला जातो. सैनिक, पोलिस दल यांचे मनोबल वाढावे म्हणून हा कार्यक्रम साजरा केला जातो. समुद्राला नारळ अर्पण करतात म्हणून या सणास नारळी पोर्णिमा असे म्हणतात. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रशालेत मुलांनी मुलीची काळजी घेत बहिण भावाचे नाते दृढ झाले पाहिजे असे मत मांडले.
प्रशालेतील अंधमुलींनी घरापासून दूर राहणार्या वारकरी शिक्षण घेणाऱ्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या व इतर वर्गातील विद्यार्थीनिनी स्वत: बनविलेल्या राख्या बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
राजू नहार यांनी ‘येरे येरे भाऊराया, राखी पौर्णिमेला’ हे गीत गात सर्वांना भावनिक साद घातली. संस्थ्येचे विश्वस्त प्रकाश काळे यांनी विद्यार्थ्यांनी बहिण भावाचे नाते आजन्म जपावे. ज्या मुलीने आज राखी बांधली आहे तिला बहिण मानून भेटवस्तू द्याव्यात व येथुन पुढे तिच्याच हस्ते राखी बांधून घ्यावी. विद्यार्थ्यांनी आपले आचरण संस्कारक्षम करावे यामुळे विद्यार्थ्याची व देशाची प्रगती होवून सुजान समाज तयार होईल असे विचार मांडले.
संस्थ्येचे सचिव अजित वडगांवकर यांनी आपल्या मनोगता मध्ये रक्षाबंधनाचे महत्त्व विशद केले. भाऊ बहिणीच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असेल तर तो बहिणीचे रक्षण करेल, ती सुरक्षित राहील. समाजातील महिलांवर होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याचारांवर नक्कीच आळा बसेल, या पवित्र सणाचे महत्त्व आयुष्य भर जपावे. समाजातील संरक्षण यंत्रणा यांचा माहिती सांगत त्यांचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली शेळके यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन राहुल चव्हाण यांनी केले. कार्यक्रमामध्ये वर्षा काळे, निशा कांबळे, प्रतिभा भालेराव यांनी सहकार्य केले. घोलप यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.