नवी दिल्ली (Pclive7.com):- शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा सरासरी इतका पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांसह संपूर्ण देशासाठी ही आनंदाचीच बातमी आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये सरासरीइतका पाऊस पडणार असं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत ९६ ते १०० टक्के पाऊस पडेल असंही हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
सध्या अवघा देश कोरोना नावाच्या संकटाशी लढतो आहे. अशात हवामान खात्याने दिलेली बातमी ही काहीशी दिलासा देणारी आहे. ५ जून ते ३० सप्टेंबर हा पावसाचा कालावधी असेल. या कालावधीत ९६ ते १०० टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. कोरोनाचं संकट हे शेतकऱ्यांवरही ओढवलं आहे. त्यांना शेती करण्यापासून अडवण्यात आलेलं नाही. मात्र पिकवलेलं उत्पादन विकायचं कुणाला? हा प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा आहे. लॉकडाउनचे चटके हे त्यांनाही बसत आहेत. अशा सगळ्या वातावरणात एक दिलासा देणारी बातमी हवामान खात्याने दिली आहे.