पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस इखलास सय्यद यांच्यावतीने दत्तवाडी, आकुर्डी येथील कष्टकरी कामगारांचा आज (दि.१) सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनाचे औचित्य साधून या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख, माजी नगरसेवक निलेश पांढरकर, माजी नगरसेवक विनायक रणसुभे, कामगार सेलचे अध्यक्ष किरण देशमुख, पुष्पाताई शेळके, कविता खराडे, शकरूला पठाण, साहूल हमीद शेख, अशोक वायकर, मनीषा गटकळ, ज्योती गोफने, आशा मराठे, निर्मला माने आदी मान्यवर उपस्थित होते.
अजित गव्हाणे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराचे रूपांतर अण्णासाहेब मगर यांच्या कल्पकतेतुन ओद्योगिक नगरी मध्ये झाले. येथे उद्योग धंदे वाढविण्याचे मोठे कार्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. तर महापालिकेला आजितदादा यांनी उंचावर नेत, या शहराला नव्याने ओळख करून दिली व वैभव प्राप्त करून दिले. त्यामुळे येथे रोजगार, उद्योग व्यावसाय निर्माण झाले. येथील कामगारांवर अन्याय होता कामा नये, जर कुणावर अन्याय होत असेल तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. त्यांना न्याय मिळवून देवू असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले.
पुढे ते म्हणाले की, इखलास सय्यद हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून परिसरात चांगले कार्य करत आहे. त्यांच्या जनसंपर्क कार्यालय मार्फत चांगले काम होत आहे. आज त्यांनी कष्टकारी कामगारांचा सन्मान केला ही बाब उल्लेखनीय आहे. कामगारांनी व नागरिकांनी त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी इखलास सय्यद यांच्याशी संपर्क साधावा. गेली दोन दशके राष्ट्रवादीकडून आकुर्डी परिसरात पक्षाचे काम चांगले सुरु आहे. आता इखलास सय्यद यांच्या माध्यमातून हे कार्य पुढे नेले जात आहे.
यावेळी कविता आल्हाट, विनायक रणसुभे, ज्ञानेश्वर ननावरे, आर.जी.जाधव, यशवंत भालेराव यांनीही मनोगते व्यक्त केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंत सोनार, गंगाधर चौधरी, विश्वनाथ मोरे, चंद्रकांत इंगळे, आण्णा भोसले, गौतम बेंद्रे, अनिल पाटील, शिवाजी मिसाळ, रमेश भोरकर, शाहरुख शेख, सुनील मोरे, भास्कर म्हस्के, जावेद पठाण, जिब्राईल शेख, नम्रता गुरव, ललिता माने, संगीता पारेख यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक इखलास सय्यद यांनी केले. तर आभार झाकीर रमजान शेख यांनी मानले. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश परदेशी यांनी केले.