पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराला मागील दोन वर्षापासून पाणीपुरवठा व प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या समाधानकारक पाऊस झाला असताना व पवना धरण शंभर टक्के भरलेले असताना सुद्धा प्रशासनाकडून दिवसाआड पाणीपुरवठा का केला जात आहे? पवना धरणातून दररोज 500 एम एल डी पाणी उचलले जात असून शहरवासीयांपर्यंत पाणी पोहोचेपर्यंत त्यातील ४० टक्के पाण्याची गळती झालेली असते. शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून महापालिकेकडून स्काडा प्रकल्प राबविण्यात आली.
पाणीचोरीवर आळा बसविण्यासाठी कोट्यावधी खर्च करत सर्व सोसायट्यांमधे पाणीमीटर बसविण्यात आले. 24×7 पाणी हि योजना करीत कोट्यावधी रूपये खर्च केले. नवीन पाईप लाईन टाकल्या परंतू पाणीपुरवठा विभाग व प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे सर्व योजना फसल्या व नागरिकांना हक्काच्या पाण्यापासून मुकावे लागले. टँकर लाॅबी आजही कार्यरत असून काही अधिकाऱ्यांना त्यांचा पाठींबा आहे. नागरिकांचे हक्काचे पाणी पळविले जात आहे. महापालिकेच्या वतीने विविध योजना व नवनवीन प्रकल्प राबविण्यात आले. परंतु पाणीपुरवठा व प्रशासनाच्या चुकीची व ढिसाळ कारभारामुळे अजूनही शहरवासीयांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.
तरी आयुक्तांनी त्यांचा नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर आपल्याकडून बर्याच अपेक्षा आहेत. तरी सदर प्रकरणी जातीने लक्ष घालून गोरगरीब सामान्य नागरिकांना हक्काचे पाणी मिळवून द्यावे, व दररोज पाणीपुरवठा करावा. त्याचबरोबर ४० टक्के होणारी पाणी गळती थांबवावी. त्याबाबत माहिती घेत प्रशासनाकडून जाणून बूजून पाणी गळती केली जाते, याचा तपास लावावा. तसेच पाणी गळती होते कि केली जाते याचा शोध घेऊन नक्की पाणी कोठे मुरते याचा देखील शोध घ्यावा व संबंधितावर कारवाई करण्यात यावी असे निवेदन पिंपरी चिंचवड शिवसेनेकडून आयुक्तांना देण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, पिंपरी महिला संघटिका सरिता साने, युवासेना अधिकारी पिंपरी निलेश हाके, निखिल येवले, बशीर सुतार, रवींद्र ब्रम्हे, निलेश तरस, राजेंद्र अडसूळ, प्रशांत कडलक, उमेश रजपूत, नरेश टेकाडे, माऊली जगताप, युवासेना प्रमुख चिंचवड अंकुश कोळेकर, प्रदिप दळवी, विभागप्रमुख सुनील पाटील, शाखा प्रमुख तुषार दहीते, मलिक मुजावर, शुभम भदाणे, रुपेश हिरे, शैला पाचपुते, शैला निकम उपस्थित होते.