भोसरी (Pclive7.com):- महाराष्ट्रभर परतीच्या पावसाने हवालदिल झालेल्या सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य वर्गाचे यंदाचे सर्व सण आनंदी व्हावेत. यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरतोय.
राज्यातील गतीमान सरकारच्या वतीने देण्यात येणारा ‘आनंदाचा शिधा’ सर्वसामान्यांच्या जीवनात गोडवा निर्माण करणारा आहे. शिंदे-फडणवीस सरकारने गतीशक्ती विकासाचा संकल्प करुन त्याची कार्यवाही सुरु केली आहे. त्यामुळे रेशनधान्य दुकानदारांनी आनंदाचा शिधा प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहचवावा, असे आवाहन करताना त्यामध्ये चूक केल्यास अथवा तक्रार आल्यास कोणालाही सुट्टी नाही. प्रसंगी संबंधित दुकान कायमचे बंद होईल, असा सूचक इशारा दिला.
दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल देण्यात येत आहे. या आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ आज कुदळवाडी सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान येथील पुरवठा कार्यालयात करण्यात आला. लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शिधा वाटण्यात आला. यावेळी रमेश राठोड, काळुराम रोकडे, गोरोबा शेळके, हंसराज कोळी, दिपक घन हे उपस्थित होते. शहरातील सर्वच रेशनधान्य दुकानातून ई-पॉसद्धारे 100 रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. तर ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाणार आहे.
राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप सरकारने गेल्या वर्षी दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ योजना राबवली होती. तर यंदा गुढीपाडवा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी आनंदाचा शिधा दिला आहे. हा शिधा प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहचवावा. त्यामध्ये कोणत्याही दुकानदाराने चुका करु नयेत, अशा सूचनाही केल्या.
हे सरकार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे आहे हेच या अशा उपक्रमातून वेळोवेळी अधोरेखित होते. आज या आनंदी शिधा वाटपाचा कार्यक्रम माझ्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वसामान्य नागरीकांकडून कौतुक होत आहे याचे समाधान वाटले.– दिनेश यादव