पिंपरी (Pclive7.com):- ‘जय जय रघुवीर समर्थ’ असा जयघोष करत.. चिंचवडमध्ये ‘मनाच्या श्लोकची’ची आज (रविवारी) प्रभात फेरी निघाली होती. सकाळी ६ ते ७ वाजता काढण्यात आली.
ही प्रभात फेरी श्री सिद्धिविनायक मंदिर संभाजीनगर पासून शाहूनगर, पूर्णानगर, शिवतेजनगर या परिसरातून काढण्यात आली. प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला ही प्रभात फेरी काढण्यात येते. आताची ही दुसरी वेळ पहिल्या प्रभात फेरीला परिसरातील ३५ नागरिकांनी सहभाग घेतला होता. या वेळेस ५५ नागरिकांनी सहभाग घेतला पुढच्या प्रभात फेरीस आणखी नागरिकांनी सहभाग घ्यावा जेणेकरून एक चांगला आदर्श लोकांपर्यंत ठेवता येईल असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.