पिंपरी (Pclive7.com):- ग्रामीण भागाशी घट्ट नाळ जोडलेला, तळागाळातील माणसांशी एक अनोखे नाते असलेला, कुठलाही वारसा नसताना, राजकारणात शिखर गाठणारा अद्वितीय नेता अशी ओळख असणाऱ्या लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या वतीने रहाटणी येथील लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे मार्ग याठिकाणी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, माजी स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, सामाजिक कार्यकर्ते नरेश खुळे, गणेश नखाते, सुभाष दराडे, गणेश ढाकणे, अभिजीत पवार, हनुमंत घुगे, बाळासाहेब आडलिंगे, विजय कांबळे, दिनेश पवार, भीमाशंकर भोसले, नागनाथ लोंढे, प्रकाश देशमुख, संजय भोसले, संजय घुमरे, रंजीत घुमरे, परमेश्वर दराडे, धोंडीराम कुंभार, शिवा बिराजदार, साहेबराव धुमाळ, दिगंबर सुरवसे, नेवसे काका, सुभाष घोडके, रामेश्वर गटकळ, शंकर नाकाडे, गरकळ सर, संभाजी नागरगोजे, जयप्रकाश दहिफळे व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी जेष्ठ समाजप्रबोधक शारदा मुंडे यांनी कै. गोपीनाथ मुंढे यांचे जीवन चरित्र कथन केले. माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, राजकारणात लागणारी जिद्द, आत्मविश्वास, संयम त्यांच्यात होता. नवा विचार, नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची त्यांची तयारी होती. उपेक्षित शोषित वर्गामधे त्यांनी नवा विश्वास निर्माण केला. हे सर्व करत असताना त्यांना राजकारणात असलेली अनिश्चितता, अपयश, जिवघेणी स्पर्धा याला सामोरे जावे लागले. ऊसतोड कामगारांचे नेते म्हणून देखील गोपीनाथ मुंडेंकडे पाहिले जाते. असा लोकनेता पुन्हा होणे नाही, अशा शब्दांत त्रिभुवन यांनी आदरांजली वाहिली.