पिंपरी (Pclive7.com):- नेहरूनगरलगत एमआयडीसी परिसरात २२२ इंडस्टीस गाळे गेली आठ वर्षा पासुन पडून आहेत. त्या ठिकाणी महिला बचत गटात स्मॉल इंडस्ट्रीजचे उद्योग सुरू करण्यास सदर गाळ्यांपैकी ५० गाळे हे वाटप करण्यात यावे अशी मागणी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र कामगार आघाडीच्या अध्यक्षा राजश्री जायभाय यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. परंतु बचत गटास केंद्र व राज्य सरकारच्या धोरणानुसार बँक कर्ज, बिज भांडवल उपलब्ध करून त्यांना उद्योग उभारणीसाठी धोरण ठरविण्यात यावे यासाठी आम्ही उच्चशिक्षित महिलांनी बचत गट स्थापन केले आहेत.
बचत गट आणि महासंघ यांना स्मॉल इंडस्ट्रीज उद्योग उभारणीसाठी बस डेपो व डी वाय पाटील दोन्हीच्या मध्ये २२२ गाळे बांधण्यात आले आहेत. परंतु गेली सहा वर्षा दिवसांपासून हे गाळे बंद असून धूळखात पडले आहेत. हे गाळे बचत गटांना देण्यात यावे अशी मागणी राजश्री जायभाय यांनी आयुक्तांकडे केली आहे. यावेळी गायत्री तळेकर, पूजा ताई आव्हाड उपस्थित होत्या.