नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
पिंपरी (Pclive7.com):- गेली आठ वर्षे रुपी को-ऑपरेटिव्ह बँक विलीनीकरणाच्या फेऱ्यात अडकली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शेकडो ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. आता या सर्वांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रुपी बँकेने रिझर्व्ह बँकेला रुपी बँकेचे म्हैसाळा बँकेमध्ये विलिनीकरण किंवा बँकेचे पुनरुज्जीवन करण्याचा पर्याय न्यायालयात दिला आहे. त्याला रिझर्व्ह बँकेने होकार दर्शवला असून या प्रस्तावावर विचार करून ३० डिसेंबर २०२१ पर्यंत निर्णय घ्यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आरबीआय दिला. त्यामुळे रुपी बँक चालू किंवा विलिनीकरण होईल. त्यामुळे नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात रुपी को-ऑपरेटिव्ही बँकेचे शेकडो खातेदार व ठेवीदार आहेत. त्यामाध्यमातून सुमारे १ हजार २९७ कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत आहेत. सुमारे आठ वर्षापूर्वी विविध कारणांमुळे रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेवर निर्बंध लादले होते. त्यामुळे खातेदार, ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. आता रुपी बँकेची आर्थिक परिस्थिती चांगली असून बँक चालू होऊ शकते. बँक चालू करण्याची परवानगी देण्यासाठी नगरसेवक संदिप वाघेरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर मागील आठवड्यात सुनावणी झाली. वाघेरे यांच्या वतीने अॅड. अनंत रणदिवे, ऍड. विलास तापकीर यांनी बाजू मांडली.
अॅड. अनंत रणदिवे यांनी माहिती देताना सांगितले की, रुपी बँकेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. बँक चालू होऊ शकते. त्यासाठी पुरावे देखील दिले. बँक चालवू शकतो असे पत्र रुपी बँकेनेही दिले. आरबीआयने इतर बँकांना चालू करण्यासाठी खूप मदत केली आहे. आम्हाला पण मदत करावी अशी मागणी रुपी बँकेने केली. बँक चालू करण्यासाठी आम्ही मदत करण्यास तयार आहोत. आमच्या ठेवीतील पैसे काही दिवस ठेवा पण बँक चालू करावी.
त्यावर न्यायाल्याने आरबीआयला यावर तुम्ही विचार करणार का? असे विचारले. त्यावर त्यांनी होकार दर्शविला. म्हैसाळा बँकेने रुपी बँक टेक ओव्हर करण्यास तयार असल्याचे सांगितले. या प्रस्तावावर आरबीआयने ३० डिसेंबर पर्यंत निर्णय असे न्यायालयाने सांगितले. त्याला आरबीआयने होकार दर्शविला आहे. त्यामुळे रुपी बँक चालू होईल किंवा विलिनीकरण होईल. त्यामुळे शेकडो ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.
नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक कष्टकरी, गोरगरीब नागरिकांचे रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेत पैसे अडकले आहेत. गेली आठ वर्षे रुपी बँक विलीनीकरणाच्या फेऱ्यात अडकली आहे. त्यामुळे बँकेच्या अनेक ठेवीदारांच्या समोर आर्थिक अडचण उभी राहिली आहे. आता बँकेची आर्थिक स्थिती सुधारल्याने बँक पुनरुज्जीवीत होऊ शकते. बँक चालू करण्यासाठी आमच्या ठेवी काही दिवस ठेवाव्यात. पण, बँक चालू करावी, अशी आमची मागणी होती. त्यामुळे आता ३० डिसेंबर पर्यंत अंतिम निर्णय होईल. रुपी बँक चालू होईल किंवा विलिनीकरण होईल. बँक चालू झाली किंवा विलिनीकरण झाले तरी, शेकडो ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे. खातेदार, ठेवीदारांचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यासाठी आजपर्यंत करत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.”