पिंपरी (Pclive7.com):- हिंजवडी आयटी परिसरातून रहाटणी, पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव परिसरात येणारे-जाणारे चाकरमान्यांचा मुख्य रस्ता असणाऱ्या कोकणे चौक ते पी.के.चौक दरम्यान दररोज वाहतूक कोंडी करावा लागत आहे. या परिसरात स्मार्ट सिटीची चाललेली संत कामे व अनाठाई वाढवलेले फुटपाथ यामुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याची खंत सामाजिक कार्यकर्त्या अनिता संदीप काटे यांनी व्यक्त केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील माण, मारुंजी, हिंजवडी आणि तळवडे परिसरात मोठ्या प्रमाणात माहिती-तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या आहेत. त्यामुळे येथे या कंपन्यांतील आयटीएन्स आणि कामगारवर्ग मोठ्या संख्येने ये-जा करतो. वाकड-भूमकर चौक, पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक ते पी.के. चौक यादरम्यान चुकीचे सिग्नल व अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी नेहमी होताना दिसत आहे.
उद्योगनगरीतील कामगार वर्ग दररोज वाहने लाखोंच्या संख्येने रस्त्यावर येत असल्याने नाशिक फाटा ते हिंजवडी रस्त्यांवर सातत्याने वाहतूककोंडी होत असल्याने आयटी अभियंते हैराण झाले आहेत. हिंजवडी, तळेगाव, चाकण व पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील सुमारे ३५ लाखांहून अधिक रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. चाकण, भोसरी, तळवडे, हिंजवडी परिसरात आयटी कंपन्यांसह मोठे, मध्यम व लघुउद्योग आहेत. या क्षेत्रातील लाखो कामगार या रोडवरून कामानिमित्त येजा करतात.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये आयटी कंपन्या फेज १, २ व ३ क्षेत्रात शेकडो कंपन्या कार्यरत आहेत. राज्य व देशभरातील २० लाख नागरिक या शहरात नोकरी व व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. त्या तुलनेत शहरातील वाहतूक व्यवस्था तोकडी आहे. त्यातच स्मार्ट सिटी अंतर्गत मुख्य रहदारीचा रस्त्यावरती फुटपाथ मोठे करण्यात आल्याने रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होणार असल्याने भविष्याचा विचार करता पोलीस व पालिका प्रशासनाने शहरातील सुरळीत वाहतूक व्यवस्था करावी अशी मागणीही अनिता काटे यांनी केली आहे.