मुंबई (Pclive7.com):- मुंबईतील कुर्ल्याच्या नाईक नगर परिसरात सोमवारी रात्री उशिरा चार मजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले गेले असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखालून १४ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. मात्र अजूनही २०-२५ लोक खाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. त्यामुळे मदतकार्यात मदतीसाठी एनडीआरएफलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आहे.
अपघातानंतर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांन घटनास्थळी भेट दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मजली इमारत जीर्ण झाली होती. या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना इमारत रिकामी करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. असं असतानाही ते या ठिकाणी राहत होते.
भविष्यात अशा दुर्घटना घडू नये म्हणून आता मंगळवारी म्हणजेच आज या चार इमारती रिकाम्या करून पाडण्यात येणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.