
महानगरपालिका निवडणुकीमुळे शहरात राजकीय वातावरण तापले असून, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवार सकाळपासूनच मतदान केंद्रांवर दाखल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.

यावेळी माध्यमांशी बोलताना शत्रुघ्न काटे म्हणाले, “मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे पवित्र कर्तव्य आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी सक्षम आणि स्थिर नेतृत्व निवडणे अत्यंत गरजेचे आहे,” असे आवाहन त्यांनी केले.






















Join Our Whatsapp Group