पिंपरी (प्रतिनिधी):- आपल्या सहा महिन्याच्या गलथान कारभाराने ‘बेस्ट’ सिटीची वाट लावणा-या सभागृह नेते एकनाथ पवार यांनी आत्मपरिक्षण करावे. उठसूठ राष्ट्रवादीवर टीका-टिप्पणी करण्यापेक्षा शहरातील करदात्या नागरिकांना मुलभूत सुविधा पुरवाव्यात. आपली पात्रता पाहून ज्येष्ठ नेत्यांवर टीका करावी असे प्रतित्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी पवार यांना दिले आहे.
एकनाथ पवार यांनी देशाचे नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. राष्ट्रवादीमुळे शहराची वाट लागल्याचा आरोपही केला होता. त्यावर संजोग वाघेरे यांनी एकनाथ पवार यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. संजोग वाघेरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट केला आहे, हे शहरातील जनतेला माहित आहे. भाजपने खोटे-नाटे आरोप करुन महापालिकेतील सत्ता मिळविली आहे. गेल्या सहा महिन्यात भाजपने बेस्ट सिटीचा पुरस्कार मिळालेल्या शहराची वाट लावली आहे. नागरिकांना पिण्यासाठी मुबलक पाणी मिळत नाही. शहरातील कचरा उचलला जात नाही. राजकीय आरोप करण्यापेक्षा आपण सत्तेत आहोत. याचे भान ठेऊन काम करावे. आता राष्ट्रवादीच्या नावाने बोटे मोडण्याचे थांबवावे, कामाचा ‘रिझल्ट’ द्या
अनधिकृत बांधकामे नियमीत केल्याचे भाजपचे लोक सांगत आहेत. परंतु, त्यासाठी आघाडी सरकारने कुंटे समितीची नेमणूक केली होती, हे विसरु नका असे सांगत वाघेरे यांनी म्हटले आहे की, एकनाथ पवार हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत देखील पराभूत झाले होते. नगरसेवक म्हणून निवडून येण्याचीही त्यांची क्षमता नाही. आता आमदार महेश लांडगे यांच्या पुण्याईवर ते किमान नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. एकनाथ पवार यांची बौद्धीक दिवाळखोरी झाली आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष व देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका करत आहेत. एकनाथ पवार यांनी आपली उंची पाहून टीका-टीप्पणी करावी. तोंडाच्या टकळी चालविण्याऐवजी जनहिताची चार कामे करावीत. आपला वेळ सतकारणी लावावा, असा सल्ला संजोग वाघेरे यांनी एकनाथ पवार यांना दिला आहे.
रेडझोनचा प्रश्न किचकट आहे. पवारसाहेबांनी संरक्षणमंत्री असताना तो प्रश्न सोडविण्याचा अटोकाट प्रयत्न केला होता.आणि काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या पुढाकाराने रेडझोनची सीमा हद कमी करण्यात आली. यापूर्वी वाजपेयी सरकार केंद्रात सत्तेत होते. त्यामध्ये भाजपचे जॉर्ज फर्नांडीस संरक्षणमंत्री होते. त्यांनी काय रेडझोनचा प्रश्न सोडविला नाही. आता मोदी सरकार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रे