पिंपरी (Pclive7.com):- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आपल्या साहित्य कृतीतुन अजरामर झाले. साहित्यरत्न म्हणून ओळखले जाणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य केले असे मत शिवसैनिक युवराज दाखले यांनी व्यक्त केले. शिवसेना रहाटणी काळेवाडी विभाग व महाराष्ट्र दलित युवक महासंघ तसेच लहुजी श्री बॉईजच्या वतीने छत्रपत्ती संभाजी महाराज प्रवेशद्वार या ठिकाणी शिवसैनिक युवराज दाखले व अमोल तेलंगे यांच्या शुभहस्ते हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच महाराष्ट्र दलित युवक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मारूती दाखले यांच्या मार्गदर्शनाखाली वरील ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नदान वाटप करण्यात आले. या अन्नदानाचे नियोजन लहुजी श्री बॉईजचे अध्यक्ष अमोल तेलंगे यांनी केले.
यावेळी शिवसैनिक युवराज दाखले, अमोल तेलंगे, सचिन तेलंगे, भिमराव ढवारे, अशोक तेलंगे,मारूती दगडे, सचिन तेलंगे, रविंद्र थोरात,सन्नी निकाळजे, बाळु थोरात,सचिन घोलप,आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.