पिंपरी (Pclive7.com):- देशात ओबीसीं व बलुतेदारांची लोकसंख्या मोठी आहे. त्यांनी संघटित लढा उभारावा व त्यातून त्यांनी त्यांच्या हिताच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकाभिमुख सरकार त्यादुष्टीने न्यायाची भूमिका घेत आहे. पुढील काळातही घेत राहील अशी ग्वाही खासदार अमर साबळे यांनी बलुतेदारांच्या शिष्टमंडळाला दिली. बारा बलुतेदार समाज विकास संघाच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन त्यांना संघाचे अध्यक्ष रामदास सूर्यवंशी व निरीक्षक प्रदीप वाळुंजकर यांच्या हस्ते देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी सचिव राजेंद्र पंडित, संपर्कप्रमुख विशाल वाळुंजकर, उस्तवप्रमुख रोहीत यवतकर, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष नागेश भोपुलकर, महिलाध्यक्ष सरला कानमपल्लीवार, अशोक पंडित, अमीर शेख, देवेंद्र शिरसाठ, गणेश वाळुंजकर, संतोष शिंदे, चेतन भालेराव, संदीप राऊत, अनंत कानडे, नितीन कुटे, प्रशांत गायकवाड, विशाल गुडेकर-कुंभार आदी उपस्थित होते.
यावेळी शिष्टमंडाळाने बारा बलुतेदारांना स्वतंत्र बजेट देणे, ओबीसी जनगणनना जाहीर करणे, बलुतेदारांना क्रिमिलिअर मधून वगळणे, बारा बलुतेदारांसाठी व्यवसायिक शैक्षणिक प्रगतीचे धोरण ठरविणे, बारा बलुतेदारांना स्वतंत्र राजकीय व शासकीय प्रतिनिधीत्व तसेच जननायक कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न व राष्ट्रसंत सेना व नामदेव महाराज यांच्यासह स्वातंत्र्यसूर्य हु.भाई कोतवाल यांचे टपाल तिकिट काढावे आदी मागण्या करण्यात आल्या.
यासर्व मागण्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन शिष्टमंडाळास खासदार अमर साबळे यांनी दिले.सूत्रसंचालन विशाल वाळुंजकर तर आभार नागेश भोपूलकर यांनी मानले. निवेदन वाचन सचिव राजेंद्र पंडित यांनी केले.