पिंपरी (Pclive7.com):- दोन महिन्यापूर्वी पूर्ण झालेला ‘हॅरीस’ पुल उद्घाटनाच्या वादात अडकल्यामुळे चांगलाच चर्चेत राहिला होता. पालकमंत्री गिरीष बापट यांची वेळ मिळत नसल्यामुळे या पुलाचे उद्घाटन रखडले होते. त्यामुळे राष्ट्रवादीने आंदोलन करत हा रस्ता उद्घाटन करत वाहतुकीस खुला केला होता. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी काम अपूर्ण असल्याचे सांगत तो पुल त्याच दिवशी बंद केला होता. या पुलाचे उद्घाटन आज आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते घाईगडबडीत करण्यात आले. त्यामुळे पिंपरी चिंचवडची पालकमंत्र्यांना ‘ऍलर्जी’च असल्याचे सिध्द झाले असल्याची टिका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केली आहे.
पिंपरी महापालिकेत पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपाला कुठलाच विकासाचा अजेंडा नाही. राष्ट्रवादीने भूमीपूजन केलेल्या केलेल्या कामांचीच भाजपकडून उद्घाटने होत आहेत. पालकमंत्र्यांना शहराच्या विकासाशी काही देणंघेणं नाही. त्यांना पिंपरी चिंचवडची ‘ऍलर्जी’ आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पूर्ण झालेल्या ‘हॅरीस’ पुलाच्या उद्घाटनासाठी गिरीष बापट यांना वेळ नाही. आज अखेर आमदार लक्ष्मण जगताप यांच्याच हस्ते या पुलाचे उद्घाटन घाईगडबडीत उरकण्यात आले. यावरूनच पालकमंत्र्यांना पिंपरी चिंचवडची ‘ऍलर्जी’च असल्याचे सिध्द होत असल्याची टिका संजोग वाघेरे पाटील यांनी केली आहे.