पिंपरी :- चेन्नई, कोलकाता आणि इंदूर असे तिन वन-डे सामने जिंकत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन-डे मालिकेत ३-० ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेलं २९४ धावांचं आव्हान भारताने ५ गडी राखुन पूर्ण केलं. सलामीवीर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेने शतकी भागीदारी करत सामन्यावर भारताचं वर्चस्व कायम राहील याची काळजी घेतली. या खेळीत रोहीत आणि अजिंक्यने आपापली अर्धशतक साजरी केली. मात्र यानंतर लागोपाठ विकेट गेल्याने भारताच्या गोटात काहीकाळ चिंतेचं वातावरण पसरलेलं होतं. मात्र हार्दिक पांड्याने सर्वप्रथ कर्णधार विराट कोहली आणि त्यानंतर मनिष पांडेच्या सहाय्याने अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
भारताच्या फलंदाजांना लवकर माघारी धाडण्याचा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पुरेपूर प्रयत्न केला. मात्र यामध्ये त्यांना यश आलं नाही. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधीक २ बळी घेतले. तर कुल्टर नाईल, रिचर्डसन आणि अॅगरने प्रत्येकी १-१ बळी मिळवला.