पिंपरी (Pclive7.com):- श्री राम मंदिर हिंदू समाजासाठी अस्मितेचा विषय आहे. करोडो हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर श्रीराम मंदिर निर्माण व्हावे. यासाठी साधू संत, धर्माचार्य, महाराष्ट्र राज्य व हिंदू समाजाच्या भावनांचा विचार व्हावा. हिंदू समाजाची जास्त परिक्षा पाहू नये तसेच अयोध्येत श्री राम जन्मभूमीवर मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारने कायदा करून मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी परमपूज्य संत उच्चाधिकारी समितीचे सदस्य आचार्य जितेंद्रनाथ यांनी राज्यपालांकडे केली आहे.
विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन श्रीराम जन्मभूमीवर मंदिर उभारण्यासाठी कायदा करून मार्ग मोकळा करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी श्रीनाथ पिठाधीश्वर परमपूज्य आचार्य जितेंद्रनाथ महाराज, महामंडलेश्वर महाराज, विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री सुरेंद्र जैन, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री भाऊराव कुदळे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत सह मंत्री विवेक कुलकर्णी, विदर्भ प्रातांध्यक्ष राजेश्वर निवल, विदर्भ मंत्री अजय निलावदार, चिंचवड जिल्हा प्रमुख केतनभाई पटेल आदी उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group